माय मराठीचा गोडवा न्याराच
होय, न्याराच ! मी मराठी आहे व माझी माय असलेल्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे. मराठी भाषा आणि तिचा गोडवा हा वेगळाच आहे त्यातल्या त्यात ग्रामीण बोली भाषेची तर चवच न्यारी, घाटावरची रांगडी मराठी भाषा, पुण्याची सदाशिव पेठीय अस्सल पुणेरी भाषा, मुंबईची तर बातच न्यारी अर्धी मराठी अर्धी हिंदी. “कांदा कैसा किलो रे बाबा.” मालवणी, आगरी, अशा अनेक बोली भाषांचा प्रभाव असलेली मुंबईची मराठी, नागपूरची वऱ्हाडी अगदी संत्रा बर्फीसारखी, कोल्हापूरी लवंगी मिरचीच्या ठसक्यात बोलली जाणारी मराठी , सोलापूरी सुरातली, “काय बे काय चाललंय.” कानडी भाषेचा प्रभाव पडलेला जरासा, मराठी अन् मराठवाड्याची आपली मराठी भाषा, धड ग्रामीण ना शहरी यात मोडणारी निमशहरी मराठी... शंकर पाटील, द.मा. मिराजदार यांनी बरेचसे साहित्य या भाषेत लिहिलंय ग्रामीण कथा, कादंबऱ्याचा बाजच निराळा, त्यातली अस्सल मराठमोळी पात्र व त्याचं वर्णन वाचताना आपण इतके मग्न होतो की बस्सं. खरंतर बदलत्या काळानुसार भाषेचे स्वरूप बदलत आहे.
खरंतर आपल्या पायाला ठेच लागली की आपण आई ग म्हणतो, मोठा अपघात आपल्या डोळ्यादेखत घडला तर बाप रे म्हणतो, मात्र आपली मुलं मात्र मम्मा, डॅडा या शब्दांबरोबर मोठी होतायेत आई-बाबा हे शब्द विसरत चाललयेत हे का आपल्या लक्ष्यात येत नाहीये. इंग्रजी भाषा ही एक संवाद, संपर्क माध्यम भाषा म्हणून जास्त वापरात येत असताना निश्चितच ती महत्वाची आहे पण त्याबरोबर मराठी भाषेचे महत्व व दर्जा कमी होऊ लागलाय ही बाब आपल्यासाठी नक्कीच चांगली नाही. आय.सी.य.सी बोर्डच्या नावाखाली व इंग्रजी शाळेच्या वाढत्या स्तोमामुळे मराठी शाळा नामशेष होत चालल्या आहेत. पहिलं अंगणवाडी बालवाडीचं चित्र गावागावात शहरात पाहयला मिळायचं तर आता गल्ली बोळात आपल्याला किंडर गार्डन, प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियरचे बोर्ड दिसतात, याला कारणीभूत आपणच आहोत. आपण आता मुलाला अ अ...आई, ब...ब बाबा, म...म मराठी, शिकवायचं विसरतच चाललोय. आपण काय शिकवतो...A...for appple, B ...for ball, M...for mummy, D...daddy... असं आपण शिकवतो यात वाईट काहीच नाही पण त्यामुळे आपल्या मातृभाषेशी आपल्या मुलांची नाळ जोडलेली आपसूकच तुटून पडत आहे. त्यांना मराठी भाषेबद्दल गोडी, आपुलकी वाटत नाही. शाळेत गेल्यापासून इंग्रजी भाषा पहिली भाषा म्हणून शिकवल्यामुळे मराठी भाषा त्यांना आपसुकच क्लिष्ट वाटायला लागते. खरंतर बालवयातच मराठीची गोडी मुलांना लागली तर बालगीते, बालकथा बालकविता व बालसाहित्य वाचनाची गोडी लागेल व ती शेवटपर्यंत जपली जाईल. पुढे त्यांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलं तरी मराठी भाषेशी नाळ जोडलेली असल्यामुळे पुढीलकाळात त्याचं मायमराठीशी असलेलं नातं अतूट राहील.
मराठी भाषेचा इतिहास, त्याची व्याप्ती व महती ही फार थोर आहे. संताची वाड:मयीन परंपरा लाभलेली आपली ही संस्कृती आपणच तिचं मुल्य जपलं पाहिजे. अभंग, ओव्या, भारूड, पोवाडे, लावण्या, भक्तिगीत, भावगीतांची,जोड असलेली संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वरांपासून, छत्रपती शिवाजी महारांजाचं छत्र लाभलेली ही मराठी, मराठी साहित्याची दिंडी आपल्या खांद्यावर घेऊन प्रवास करत आलेले, व करत असलेले साहित्यिक यात संत कविपासून, बा.भ.बोरकर, बालकवीपासून, पु.ल देशपांडे. व.पु.काळे, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर पासून ते आतापर्यंतचे कवी याचं कार्य पाहिले तर अगाध साहित्य वाड:मयीन परंपरा आपल्याला लाभली आहे. मराठी ग्रंथ, साहित्य परंपरा जपतानाच, रोजच्या जगण्यात, बोलण्यात येणारे मराठी शब्द, मराठी ऋतू, मराठी महिने, मराठी वार, मराठी संस्कृती, सण व परंपरा, मराठी अनुषंगाने महाराष्ट्रायीन लोंकाच्या सांस्कृतीक व सर्वच कलावारसाचं जतन करणं व त्यासाठी मुळात मराठी भाषा जपणं गरजेचं आहे. कवी सुरेश भट्ट यांनी अतिशय समर्पक शब्दात मायमराठीचा अभिमान वर्णन करणारं गीत लिहिलं आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
विष्णू वामन शिरवकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. त्यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच़ा जन्मदिवस 'राजभाषा दिन'म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. तर चला मग यांच्या या जन्मदिनी आपण वसा घेऊया माय मराठीचा आदर करून तिचा वापर योग्य पध्दतीने जास्तीत जास्त रोजच्या जगण्यात, बोलण्यात करूया आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून बोलता, वाचता, लिहितां आलं पाहिजे यासाठी आपणच आग्रह धरूया.
तनुजा ढेरे
होय, न्याराच ! मी मराठी आहे व माझी माय असलेल्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे. मराठी भाषा आणि तिचा गोडवा हा वेगळाच आहे त्यातल्या त्यात ग्रामीण बोली भाषेची तर चवच न्यारी, घाटावरची रांगडी मराठी भाषा, पुण्याची सदाशिव पेठीय अस्सल पुणेरी भाषा, मुंबईची तर बातच न्यारी अर्धी मराठी अर्धी हिंदी. “कांदा कैसा किलो रे बाबा.” मालवणी, आगरी, अशा अनेक बोली भाषांचा प्रभाव असलेली मुंबईची मराठी, नागपूरची वऱ्हाडी अगदी संत्रा बर्फीसारखी, कोल्हापूरी लवंगी मिरचीच्या ठसक्यात बोलली जाणारी मराठी , सोलापूरी सुरातली, “काय बे काय चाललंय.” कानडी भाषेचा प्रभाव पडलेला जरासा, मराठी अन् मराठवाड्याची आपली मराठी भाषा, धड ग्रामीण ना शहरी यात मोडणारी निमशहरी मराठी... शंकर पाटील, द.मा. मिराजदार यांनी बरेचसे साहित्य या भाषेत लिहिलंय ग्रामीण कथा, कादंबऱ्याचा बाजच निराळा, त्यातली अस्सल मराठमोळी पात्र व त्याचं वर्णन वाचताना आपण इतके मग्न होतो की बस्सं. खरंतर बदलत्या काळानुसार भाषेचे स्वरूप बदलत आहे.
खरंतर आपल्या पायाला ठेच लागली की आपण आई ग म्हणतो, मोठा अपघात आपल्या डोळ्यादेखत घडला तर बाप रे म्हणतो, मात्र आपली मुलं मात्र मम्मा, डॅडा या शब्दांबरोबर मोठी होतायेत आई-बाबा हे शब्द विसरत चाललयेत हे का आपल्या लक्ष्यात येत नाहीये. इंग्रजी भाषा ही एक संवाद, संपर्क माध्यम भाषा म्हणून जास्त वापरात येत असताना निश्चितच ती महत्वाची आहे पण त्याबरोबर मराठी भाषेचे महत्व व दर्जा कमी होऊ लागलाय ही बाब आपल्यासाठी नक्कीच चांगली नाही. आय.सी.य.सी बोर्डच्या नावाखाली व इंग्रजी शाळेच्या वाढत्या स्तोमामुळे मराठी शाळा नामशेष होत चालल्या आहेत. पहिलं अंगणवाडी बालवाडीचं चित्र गावागावात शहरात पाहयला मिळायचं तर आता गल्ली बोळात आपल्याला किंडर गार्डन, प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियरचे बोर्ड दिसतात, याला कारणीभूत आपणच आहोत. आपण आता मुलाला अ अ...आई, ब...ब बाबा, म...म मराठी, शिकवायचं विसरतच चाललोय. आपण काय शिकवतो...A...for appple, B ...for ball, M...for mummy, D...daddy... असं आपण शिकवतो यात वाईट काहीच नाही पण त्यामुळे आपल्या मातृभाषेशी आपल्या मुलांची नाळ जोडलेली आपसूकच तुटून पडत आहे. त्यांना मराठी भाषेबद्दल गोडी, आपुलकी वाटत नाही. शाळेत गेल्यापासून इंग्रजी भाषा पहिली भाषा म्हणून शिकवल्यामुळे मराठी भाषा त्यांना आपसुकच क्लिष्ट वाटायला लागते. खरंतर बालवयातच मराठीची गोडी मुलांना लागली तर बालगीते, बालकथा बालकविता व बालसाहित्य वाचनाची गोडी लागेल व ती शेवटपर्यंत जपली जाईल. पुढे त्यांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलं तरी मराठी भाषेशी नाळ जोडलेली असल्यामुळे पुढीलकाळात त्याचं मायमराठीशी असलेलं नातं अतूट राहील.
मराठी भाषेचा इतिहास, त्याची व्याप्ती व महती ही फार थोर आहे. संताची वाड:मयीन परंपरा लाभलेली आपली ही संस्कृती आपणच तिचं मुल्य जपलं पाहिजे. अभंग, ओव्या, भारूड, पोवाडे, लावण्या, भक्तिगीत, भावगीतांची,जोड असलेली संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वरांपासून, छत्रपती शिवाजी महारांजाचं छत्र लाभलेली ही मराठी, मराठी साहित्याची दिंडी आपल्या खांद्यावर घेऊन प्रवास करत आलेले, व करत असलेले साहित्यिक यात संत कविपासून, बा.भ.बोरकर, बालकवीपासून, पु.ल देशपांडे. व.पु.काळे, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर पासून ते आतापर्यंतचे कवी याचं कार्य पाहिले तर अगाध साहित्य वाड:मयीन परंपरा आपल्याला लाभली आहे. मराठी ग्रंथ, साहित्य परंपरा जपतानाच, रोजच्या जगण्यात, बोलण्यात येणारे मराठी शब्द, मराठी ऋतू, मराठी महिने, मराठी वार, मराठी संस्कृती, सण व परंपरा, मराठी अनुषंगाने महाराष्ट्रायीन लोंकाच्या सांस्कृतीक व सर्वच कलावारसाचं जतन करणं व त्यासाठी मुळात मराठी भाषा जपणं गरजेचं आहे. कवी सुरेश भट्ट यांनी अतिशय समर्पक शब्दात मायमराठीचा अभिमान वर्णन करणारं गीत लिहिलं आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
विष्णू वामन शिरवकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. त्यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच़ा जन्मदिवस 'राजभाषा दिन'म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. तर चला मग यांच्या या जन्मदिनी आपण वसा घेऊया माय मराठीचा आदर करून तिचा वापर योग्य पध्दतीने जास्तीत जास्त रोजच्या जगण्यात, बोलण्यात करूया आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून बोलता, वाचता, लिहितां आलं पाहिजे यासाठी आपणच आग्रह धरूया.
तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment