Wednesday, 21 October 2020

आदिमाया अंबाबाई

 


"गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर "या अशा गजरात  अनंत चतुर्थीला गणपती चे विसर्जन भरल्या डोळ्यानी होत  नाही तोच, भाद्रपद महिना पितृ पंधरवाडा म्हाळाचे दिवस संपत आले की आईची घरात एकच घाई चालू व्हायची. नवरात्र उत्सव येणार. देवीची आरास करायचीय, पाठोपाठ दसरा. घरातली साफसफाई आई एक ना एक भांडे, डबे, कपडे सगळं घर धुवून काढायची. तिची लगबग तिचा उत्साह आईला कशाचेच भान राहयचे नाही ती उत्साहाने घरातली सगळी कामं करायची. अश्विन महिन्यात शुध्द प्रतिपदेला घटस्थापना व्हायची.

आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई

उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई.

आईच्या नावाचा जागर. गल्लो गल्लीत नाक्यावर देवीच्या आगमनाची तयारी केली जायची. विविध नवरात्र उत्सव मंडळांची जोशात तयारी चालु असायची. आई घटस्थापनेच्या आदल्या दिवशी रात्रीच सगळं पुजेचं सामान आणुन तयारी करुन ठेवायची. दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून सोवळ्यातच घटस्थापना करायची.देव-हारया च्या बाजुला चौरंगावर लाल कपडा ठेवुन त्यावर बाजारातून आणलेली नवीन वेताची दुरडी त्यात लाल नाहीतर काळी माती भरुन सात प्रकाराची धान्य बाजरी, सातु, मुग , उडीद हरभरे, ज्वारी, तीळ, जवस, पेरायची माती खालीवर करुन दुरडीत मातीचं सुगड ठेवून त्यात सव्वा रुपया ठेवायची. पाच पानं खायची (नागवेलीच्या वेलीची ) विडयाची कडेनी मांडून, त्यात उभा नारळ खोवायची. त्या कलशाला अकरा विडयाच्या पानांची माळ घालायची. हळदी कुंकू फुलं वाहुन पुजा करायची. रोज थोडं पाणी सोडायचं. नऊ दिवसात घट हिरवाकंच फुलोरा उगवून यायचा. नऊ दिवस दिवा सतत रात्र दिंवस तेवत ठेवायचा, नऊ दिवस नऊ माळा रोज एका फुलाची ,पानाची मखमली, तुळशीमाळ, फुलांच्या माळा घालायची, शेंगदाणा, गुळ, खिचडी, फळं, उपवासाचा नैवेद्य दाखवायचा आईनं नव रात्रात कधीच देवपुजा करायची नाही. आई सांगायची देवी गादीवर बसलेली आहे म्हणून ती उठत नाही. सगळ्या देवासमोर म्हणून मग देव ही उठत नाही.फक्त फुलं व हळद कुंकू वाहून देवांची  पुजा करायची.

नऊ दिवस पायात आई चप्पल घालायची नाही,खाटेवर बसायची नाही, गादीवर झोपायची नाही कारण आई खाटेवर गादीवर बसलेली असते असं आई सांगायची.सकाळी सकाळी लवकर उठुन ती घरातली पुजाअर्चा झाली की,रोज पहाटे एका देवीच्या दर्शनाला जायची. आईची खणा नारळाने ओटी भरायची. दिवसभर फळं आणि फराळाचं खाऊन आई नऊ दिवस  उपवास करायची. आई सतत घरातला घटासमोरचा दिवा विझु नये म्हणुन काळजी घ्यायची. चार दिवस झाले की पाचव्या दिवशी आई नवरात्रात देवीला मैदा, रवा, पिठी साखर, तुप गरम घालून त्याचं पीठ मळून पातळ खुसखुशीत कडकणी करायची. देवीला घटाला पाच सात कडकण्याची माळ बांधायची. पातळ खुसखुसशीत  कडकणी आम्हा सर्वांना खूप आवडायची. आई दारात जोगवा मागायला आलेल्या वा मंदिराबाहेरील बसलेल्या बायकांच्या परडया भरायची, पीठ मीठ तेलानं पाच किंवा सात अशाप्रकारे.

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटाची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीची नऊ दिवस उपासना केली जाते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच, दस-याच्या दिवशी गावातील पुरुष मंडळी गावातील देवीच्या मंदिरात शिलिंगण खेळायला जातात. डोक्यावर टोपी घालुन त्यात घटातील धान्यांचे तुरे खोवून आपटयाची पानं देवी समोर ठेवून नारळ फोडतात. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी म्हणुन ही साजरा करण्यात येतो.आई सांगायची. महाराष्ट्रात दसर्‍याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमी पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापार्‍यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे आई सांगायची. यादिवशी रामाने रावणाचा वध केला. पाच पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले. हे ही महत्व आहे या दिवसाला.

नवरात्र नऊ दिवस नऊ रात्री जागरण दांडीया गरबा आम्ही मुलं खेळायचो. रूपा भवानी हे सोलापुरचं प्रसिध्द देवीचं मंदीर. या देवीबरोबरच इथे राहयला आल्यानंतर विविध चौकातील व नाक्यावरील नवरात्र मंडळ व देखावे हे पाहण्यासाठी भाविकांचा उत्साह हा ओंसाडून वाहतो. सोलापूरात नवरात्र उत्सव हा ..मोठया उत्साहाने व आनंदाने हा सण साजरा केला जातो...सोलापूरातील जनसमुह या बरोबरच तळजापुरची आई कुलस्वामिनी अंबाबाई ला खूप मानतो. आईची मनापासुन आराधना करतात.नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी पायी पायी जातातच....पण त्या ही पेक्षा चैत्र पुनवेला जेंव्हा आई गादीवरून उठते...तो दिवस चैत्र पौर्णिमेचा अगदी देवीच्या मंदिराची आरास आणि एकुनच भाविकाची भक्ताची गर्दी डोळे दिपवुन टाकणारा एक अनुभव असतो.

|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरन्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते ||

------ सौ.तनुजा ढेरे


Wednesday, 14 October 2020

स्पेस

आयुष्यात प्रत्येकाला थोडा तरी स्पेस हवाच असतोनाही असायलाच हवास्पेस म्हणजे तर काय ? तर स्वतःसाठी थोडासा वेळथोडीशी मोकळीकआपल्या हवं तसं आपल्याला आवडतं तसं जगण्यासाठीकधी कधी चल असा ही विचार करू की आवडतं तसंजगणं तर राहू देदोन मिनीट स्वतःसाठी कुठलं ही ओझं नको डोक्यावरशांत पणे पडून रहावंबसून रहावंअसं कोणाला वाटतनाही सांगा पाहूस्वाभाविक आहे असं वाटणं.


रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण विसरत चाललोय मोकळा श्वास घेणंघडयाळाच्या काट्यावर चालणारं जगइंटरनेटच्या मोहमायी दुनियेत हरवत जरी चाललं असलं तरी थकूनभागून ते सुध्दा मनच आहेडोळ्यांना तरी किती पेलणारताण थोडी शांतता हवी असतेचखरंतर थोडासा वेळअंतर या अर्थाने स्पेस हा शब्द म्हणायचं होतं मलाआयुष्यात तोच तोचपणाआला की जगणं बोथट व्हायला लागतंचौकटीतलं जगणं नकोसं वाटायला लागतंवाटतं आता काहीच नको आणि प्रवास सुरूहोतो नकारात्मक मी चाअसं नको व्हायला खरंतर.


खरंतर एक कुटूंबाचा विचार केला तरबाबांना दिवसभर काम करून थकलेले घरी आल्यावर थोडासा विसावा हवा असतोशनिवाररवीवार मित्रांना भेटायचं आधेमधे बाहेरगावची ट्रिपनाहीतर मित्रांच्या पिकनिकचं आमंत्रण असतंचमुलाला मुलीला शाळाकाॅलेजातून आपल्याला आवडतं तसं थोडसं बाहेर आपआपल्या मित्रमैत्रिंणी बरोबर फिरयाला आवडतंत्यांची करमणुकीची साधणंआवडीनिवडी  बरोबर हल्लीची मुलं जोपासतातविचारतही नाहीतआजीआजोबांना ही आपल्या आता हवं तसं जगायला आवडतंआयुष्यभर कष्ट करून थकलेले हातपाय जास्त दगदग सोसवत नाही म्हणत गल्लीतला एक फेरफटका. "काय कसं काय चाललंय?"तब्येत  बरी आहे ना ? या दोन वाक्याने देखील ही माणसे सुखावतातघटकाभर फिरणं ही उत्साह निर्माण करतंआवडीचीपुस्तकं वाचणंआपला छंद जोपासणं अर्थात झेपेल असेच सोपस्कार हे लोकही आपआपल्या परीने प्रयत्न करत असतातजगण्याचाजगत ही असतात.


पण आपण कधी विचार केलाय जी स्त्री सदैव घरात असतेसकाळ पासून रात्री झोपे पर्यत आपल्या मुलांचानवऱ्याचाघरातल्याथोरामोठ्यांचाघराचा विचार करत असतेघरकामवेळ मिळाला इतर छंद एखादा त्याला वेळ देणेकितीसं जमतं तीला ? नोकरीकरणारी स्त्री सकाळी रात्री सगळं घर आवरुन झोपलेली असतेपरत सकाळी अलारामच्या गजराबरोबर पहिलं उठणारी ही एकगृहणीपत्नीपरत नोकरी सगळी आव्हाने पेलत असते अगदी तारेवरची कसरत करतनोकरी करणाऱ्या स्त्रीया थोड्याफार प्रमाणातऑफीसमधे बाहेर मित्रमैत्रिणींच्या बरोबर गप्पा होत असतीलपण ज्या गृहणी आहेतज्यांनी आपल्या उंबरठयाची चौकट अजूनहीओलांडली नाही ? काय करत असतील त्या ? का आतल्या आत कुजत असतील ? का त्यांचा भावना बोथट होत असतीलजीवनाकडे पाहण्याच्या त्यांचा दृष्टीकोन संकुचीत बनत चालला असेलखूप अवघड प्रश्न आहे खरं पाहयला गेलं तरउत्तर ही साधंसोपं सरळ आहे तिला तिच्या मनासारखं जगण्यासाठी थोडासा स्पेस देणे तिनं ही स्वतःसाठी काही क्षण राखून ठेवणं आपल्यालाआवडणाऱ्या गोष्टीसाठी खूप महत्वाचं आहे.


      अती प्रेम किंवा अती सुखआनंद सुध्दा नकोसा वाटतोआयुष्यात प्रत्येक गोष्ट अती झाली की नकोशी वाटतेम्हणतात ना"अती तिथे माती " असंच आहे एखादया व्यक्ती वर प्रेम आहे म्हणून आपण चोवीस तास त्याच विषयावर बोलत बसलो तरआपल्याला कंटाळा येईलम्हणुन योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला हवं तसं जगण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाने स्पेस दिला तरदोंघाचे ही आयुष्य सुखी होईल नाही का वाटत तुलापूर्वी बदल म्हणून किंवा तोचतोच पणा आला रोजच्या दिनचर्यत की आपण मामा मामी , आत्या , काका-काकू,आजी कडे जायचोआई  तिच्या मावशीकडे आजोळी जायचीमजा यायची तेवढाच बदल पण  हल्ली नात्यातलं अंतर दुरावा वाढत चाललायजो कमी हवा उलटनातं जपलंच  जात नाहीयेनावाला कामापुरती प्रासंगिक नातीजपली जातायेत .


जग संकुचीत बनत चाललंय यात ही घरातल्या गृहणीला अथवा स्त्रीला वाटत असेल की आपल्याला थोडं जगण्याचं स्वातंत्र्य हवंतर आपण या चौकटीतून बाहेर पडायला हवंदिवसभराच्या कामाच्या पसा-यातून ती गृहीणी असो किंवा नोकरी करणारी  स्त्रीआपल्याला जे आवडतं ते करावंकुणाला गाणी ऐकायलाकुणाला वाचायलालिहायला वा एखादयाला संगीताची आवड असेलतर त्यासाठी वेळ दयावाघरातल्या सर्वांनीच तिलाही तिच्या मित्रमैत्रणींबरोबरसहकार्याबरोबर आपण जसं जातो तसं तिच्यामनाचा आनंदाचा विचार करून जाऊ दयायला हवेएक छोटासा प्रयत्न बदल आयुष्यातील तिच्या तोच तोच पणा कमी होऊन तीआनंदी  उत्साही राहील  आपोआपच घर ही आनंदी  प्रसन्न राहीलंकारण ज्या घरातली स्त्री सुख समाधान शांतीने रहातअसेलत्या घरात लक्ष्मी नांदते म्हणतात ना ते काही खोटं नाही.


        खरंतर आपणच आपल्यातल्या कलागुणांना जोपासलं हवंदररोज उठून खाणं पिणं कामं करणंएका चाकोरीतून  पाहताजीवनाकडेआजुबाजूच्या विविध सांस्कृतिक वा अनेक प्रसंगारुप क्रार्यक्रमाचा अस्वाद घ्यायला हवाकाहीच नाहीतर दररोज थोडसंमोकळया हवेत फिरून जरी आलो तरी बराच मनावरील ताण कमी होईलआणि परत नव्या उत्साहाने जोमाने कामाला सुरवातहोईल प्रसन्न मनाने नाही का ?