आयुष्यात प्रत्येकाला थोडा तरी स्पेस हवाच असतो. नाही असायलाच हवा. स्पेस म्हणजे तर काय ? तर स्वतःसाठी थोडासा वेळ. थोडीशी मोकळीक. आपल्या हवं तसं आपल्याला आवडतं तसं जगण्यासाठी. कधी कधी चल असा ही विचार करू की आवडतं तसंजगणं तर राहू दे, दोन मिनीट स्वतःसाठी कुठलं ही ओझं नको डोक्यावर. शांत पणे पडून रहावं. बसून रहावं. असं कोणाला वाटतनाही सांगा पाहू. स्वाभाविक आहे असं वाटणं.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण विसरत चाललोय मोकळा श्वास घेणं. घडयाळाच्या काट्यावर चालणारं जग. इंटरनेटच्या मोहमायी दुनियेत हरवत जरी चाललं असलं तरी थकूनभागून ते सुध्दा मनच आहे. डोळ्यांना तरी किती पेलणारताण थोडी शांतता हवी असतेच. खरंतर थोडासा वेळ. अंतर या अर्थाने स्पेस हा शब्द म्हणायचं होतं मला. आयुष्यात तोच तोचपणाआला की जगणं बोथट व्हायला लागतं. चौकटीतलं जगणं नकोसं वाटायला लागतं. वाटतं आता काहीच नको आणि प्रवास सुरूहोतो नकारात्मक मी चा. असं नको व्हायला खरंतर.
खरंतर एक कुटूंबाचा विचार केला तर. बाबांना दिवसभर काम करून थकलेले घरी आल्यावर थोडासा विसावा हवा असतो. शनिवार, रवीवार मित्रांना भेटायचं आधेमधे बाहेरगावची ट्रिप. नाहीतर मित्रांच्या पिकनिकचं आमंत्रण असतंच. मुलाला मुलीला शाळाकाॅलेजातून आपल्याला आवडतं तसं थोडसं बाहेर आपआपल्या मित्रमैत्रिंणी बरोबर फिरयाला आवडतं. त्यांची करमणुकीची साधणं. आवडीनिवडी बरोबर हल्लीची मुलं जोपासतात. विचारतही नाहीत. आजीआजोबांना ही आपल्या आता हवं तसं जगायला आवडतं. आयुष्यभर कष्ट करून थकलेले हातपाय जास्त दगदग सोसवत नाही म्हणत गल्लीतला एक फेरफटका. "काय कसं काय चाललंय?"तब्येत बरी आहे ना ? या दोन वाक्याने देखील ही माणसे सुखावतात. घटकाभर फिरणं ही उत्साह निर्माण करतं. आवडीचीपुस्तकं वाचणं, आपला छंद जोपासणं अर्थात झेपेल असेच सोपस्कार हे लोकही आपआपल्या परीने प्रयत्न करत असतातजगण्याचा. जगत ही असतात.
पण आपण कधी विचार केलाय जी स्त्री सदैव घरात असते. सकाळ पासून रात्री झोपे पर्यत आपल्या मुलांचा, नवऱ्याचा, घरातल्याथोरामोठ्यांचा, घराचा विचार करत असते. घरकाम. वेळ मिळाला इतर छंद एखादा त्याला वेळ देणे. कितीसं जमतं तीला ? नोकरीकरणारी स्त्री सकाळी रात्री सगळं घर आवरुन झोपलेली असते. परत सकाळी अलारामच्या गजराबरोबर पहिलं उठणारी ही एकगृहणी, पत्नी, परत नोकरी सगळी आव्हाने पेलत असते अगदी तारेवरची कसरत करत. नोकरी करणाऱ्या स्त्रीया थोड्याफार प्रमाणातऑफीसमधे बाहेर मित्रमैत्रिणींच्या बरोबर गप्पा होत असतील. पण ज्या गृहणी आहेत. ज्यांनी आपल्या उंबरठयाची चौकट अजूनहीओलांडली नाही ? काय करत असतील त्या ? का आतल्या आत कुजत असतील ? का त्यांचा भावना बोथट होत असतील, जीवनाकडे पाहण्याच्या त्यांचा दृष्टीकोन संकुचीत बनत चालला असेल. खूप अवघड प्रश्न आहे खरं पाहयला गेलं तर. उत्तर ही साधंसोपं सरळ आहे तिला तिच्या मनासारखं जगण्यासाठी थोडासा स्पेस देणे. व तिनं ही स्वतःसाठी काही क्षण राखून ठेवणं आपल्यालाआवडणाऱ्या गोष्टीसाठी खूप महत्वाचं आहे.
अती प्रेम किंवा अती सुख, आनंद सुध्दा नकोसा वाटतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट अती झाली की नकोशी वाटते. म्हणतात ना"अती तिथे माती " असंच आहे एखादया व्यक्ती वर प्रेम आहे म्हणून आपण चोवीस तास त्याच विषयावर बोलत बसलो तरआपल्याला कंटाळा येईल. म्हणुन योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला हवं तसं जगण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाने स्पेस दिला तरदोंघाचे ही आयुष्य सुखी होईल नाही का वाटत तुला. पूर्वी बदल म्हणून किंवा तोचतोच पणा आला रोजच्या दिनचर्यत की आपण मामा मामी , आत्या , काका-काकू,आजी कडे जायचो, आई तिच्या मावशीकडे आजोळी जायची. मजा यायची तेवढाच बदल पण हल्ली नात्यातलं अंतर दुरावा वाढत चाललाय. जो कमी हवा उलट. नातं जपलंच जात नाहीये. नावाला कामापुरती प्रासंगिक नातीजपली जातायेत .
जग संकुचीत बनत चाललंय. व यात ही घरातल्या गृहणीला अथवा स्त्रीला वाटत असेल की आपल्याला थोडं जगण्याचं स्वातंत्र्य हवंतर आपण या चौकटीतून बाहेर पडायला हवं. दिवसभराच्या कामाच्या पसा-यातून ती गृहीणी असो किंवा नोकरी करणारी स्त्रीआपल्याला जे आवडतं ते करावं. कुणाला गाणी ऐकायला, कुणाला वाचायला, लिहायला वा एखादयाला संगीताची आवड असेलतर त्यासाठी वेळ दयावा. घरातल्या सर्वांनीच तिलाही तिच्या मित्रमैत्रणींबरोबर, सहकार्याबरोबर आपण जसं जातो तसं तिच्यामनाचा आनंदाचा विचार करून जाऊ दयायला हवे. एक छोटासा प्रयत्न बदल आयुष्यातील तिच्या तोच तोच पणा कमी होऊन तीआनंदी व उत्साही राहील व आपोआपच घर ही आनंदी व प्रसन्न राहीलं. कारण ज्या घरातली स्त्री सुख समाधान शांतीने रहातअसेल. त्या घरात लक्ष्मी नांदते म्हणतात ना ते काही खोटं नाही.
खरंतर आपणच आपल्यातल्या कलागुणांना जोपासलं हवं. दररोज उठून खाणं पिणं कामं करणं. एका चाकोरीतून न पाहताजीवनाकडे. आजुबाजूच्या विविध सांस्कृतिक वा अनेक प्रसंगारुप क्रार्यक्रमाचा अस्वाद घ्यायला हवा. काहीच नाहीतर दररोज थोडसंमोकळया हवेत फिरून जरी आलो तरी बराच मनावरील ताण कमी होईल. आणि परत नव्या उत्साहाने जोमाने कामाला सुरवातहोईल प्रसन्न मनाने नाही का ?
No comments:
Post a Comment