प्रिय जमू
औपचारिकता नाही ठेवणार आता दोन तीन पत्र पाठवून झाली तुला. मनातलं सांगायला एक जीवाभावाची वाट मिळाली बघ. अगं, कालच ते आपल्या गावचे नरसू पाटील घरी आले होते. भला माणूस. गावचं दहा एक वर्ष सरपंच पद निभावलं ना पाटलानं. कसलाहीगर्व नाही ना भुशारकी. अंगणवाडी, बालवाडी, महिलासाठी रात्रशाळा, आणि विशेष म्हणजे हागणदारी मुक्त गाव.घर तेथेशौचालय' असावं यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरच मानावेच लागतील. तर ते सांगत होते की. आपले वरच्या आळीतले विष्णूकाका गेले गं. चार मुली तीन मुलं सात अपत्ये आणि कमलताई त्यांच्या पत्नी असा परिवार. मुलं शिकली, मुली शिकल्या, नोकरीलालागली लग्नं झाली. चार दिशेला चार स्थिरस्थावर झाली. गावच्या वाड्यातला कलकलाट शांत झाला.
किती मायाळु आणि प्रेमळ होते विष्णू काका. भरभक्कम उंचापुरा गोरागोमटी देहयष्टी, पांढरा अंगरखा, धोतर, डोक्यावर गुलाबीरेशमी फेटा, तशाच पिळदार मिशा पायात कोल्हापूरी चप्पल असायची नेहमी. लयच रूबाब होता नाही का गं ? किती गोड बोलायचे. दारावरून जाताना घटकाभर आप्पांशी बोलल्याशिवाय पुढे जायचे नाहीत. पान काढून सुपारी कातरुन, कात घालून, चुना पानालानखाने खवून लावून नखभर पुदिन्याची कांडी टाकायचे पानात. कधी कधी हुक्की आली तर मला पण आवडायचं, विष्णू काकांच्याहातचा पानाचा विडा खायला. पान खालल्यावर इवलशे ओठ जीभ रंगले की विष्णू काका म्हणायचे, " लय प्रेम करणारा नवरामिळणार बघ तुला." आणि मी जीभ बाहेर काढत उगाचच हसायचे ह्याॅ ह्याॅ काहीही विष्णू काका तुमचं ? विष्णू काका म्हणायचे, "बरं बाई, कागदावर लिहुन देऊ का? आज खरच गं सुमा खूप प्रेम करते माझ्यावर, पण विष्णू काका नाही राहिले गं. देव चांगल्यामाणसांना का लवकर घेऊन जातो गं वरती.
जमू , तुला एक सांगू का या माणसाचा स्वभाव काही मला पटला नाही बघ. किती विचित्र गं. सगळ्या गावाशी तो प्रेमाने बोलायचा. अगदी मायेने विचारपूस करायचा पण कमलताईशी त्यांच्या पत्नीशी कधी तो नीट नाही बोलला. न कधी विचारपूस केली मायेनं. मुलंही त्यामुळे नेहमी आपल्या वडिलांच्या फटकळ वागण्यामुळे लांबच राहिली. वडिलांची माया त्यांना मिळलीच नाही. घरात नीटबोलायचं नाही. पण गावच्या सगळ्या खबरा मात्र चघळत बसायची यांची सवय यांना नंतर महाग पडली. गावातली लोकही लांबचराहू लागली यांच्यापासून. याचं त्याला अन् त्याचं याला सांगायची यांची सवय. मुलांनी मोठं झाल्यावर बापाला आधार दयायचासोडून वाळीतच टाकलं. ईस्टेटीच्या वाटण्या झाल्या अन् चार भावांनी गावच्या घराकडं अन् आईबापाकडं कायमची पाठ फिरवली. अधीमधी विष्णू काका जायचे नातवंडासाठी पण अलीकडे ते ही बंद झाले होते. मुलांनी कमलताई विष्णू काकांची वाटणी केलीहोती. एक महिना कमलताईला व एक महिना विष्णू काका असं एक एक मुलगा सांभाळणार पण विष्णू काकांना ते मान्य नव्हतं. नंतर नंतर चार पाचशे रूपडयाची मनी ऑर्डर येऊ लागली थोरल्या लेकाकडनं. पण महागाईच्या काळात कसं भागणार तसं ज्वारी, शेंगदाणं भाजीपाला घरचाच पण एवढ्यानं काय होतंय. नशिबाचे भोग म्हणायचे. आणखी काय ? नरसू पाटील सांगत होते, "विष्णूकाका, परवा थोरल्या मुलाकडं गेले होते. संध्याकाळची सातची गावाकडंची बस पकडण्यासाठी बसस्टॅन्डवर गेले. स्टॅन्डमधेच बसपकडण्याच्या घाईत विरूध्द दिशेने येणारी बस, विष्णू काकांची नजर मोतीबिंदूने कमजोर झाल्या कारणाने त्यांना समोरून येणारीदिसलीच नाही आणि बसने विष्णू काकांना उडवले." हे ऐकता क्षणी जीवाचा थरकाप उडाला बघ. किती भयानक आहे हे सगळंमाणूस क्षणात आता आहे तर आता नाही. पुढच्या क्षणी काय होईल भरोसा नाही.
माफ कर पण राहवलं नाही गं. विष्णू काका गेल्याचं कळलं आणि जीव तळमळला बघ. मला जमलं नाही जायला शेवटचं पाहयला. पण गावी आल्यावर नक्की कमलताईंना भेटेन आवर्जून. निरोप सांग माझा. माझं एवढं धाडस तर होणार नाही पण ताईवरची मायाशांत बसूही देणार नाही. खरंच जमू ही जुनी माणसं याचं जगणं एक अजबच जीवनाचं रसायन शिकवून गेली गं कळतनकळत. आताही माणसं एक एक काळाच्या पडद्याआड जातायेत. पण यांच्या स्मृती कधीही नष्ट होणार नाहीत. कारण यांच्या बोलण्यातकडवटपणा असायचा कधी कधी पण तो आपल्या हितासाठीच नाहीतर आजच्या काळातली नाती जीभेवर साखर पण आत मात्रकडवडपणा भरलेला असतो यांच्या असो खूपच लांबलं गं पत्र. पण मनात राहवलं नाही म्हणून लिहिलं.
तुझीच मैत्रीण,
बाबी.
No comments:
Post a Comment