'मही' म्हणजे पृथ्वी व 'ईला' म्हणजे सरस्वस्ती आणि या पृथ्वीवरली सरस्वती म्हणजचे महिला. खरं तर आपली आई ही सरस्वतीचं रूपच आहे. कवयित्रि बहिणाबाईनीं सुध्दा एका कवितेत किती सुंदर लिहिलंय...
‘माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या, मनी
किती गुपीतं पेरली !’
आई तूच सरसोती, मला पोटातच असताना तू बोलीभाषेचे संस्कार केलेस. आणि जीवनाची गुपीतं पेरलीस. किती अर्थगर्भ लिहिलंय. आणि हे खरंय, आपली आई आपण गर्भात असतानाच आपल्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी प्रयत्न करते. चांगल्या विचारांची, आचारांची रूजवात करते. आपल्या आजीच्या मांडीवर खेळत, गोष्टी ऐकत आपण लहानांचे मोठे होतो. आपल्यावर अनेक गोष्टीचेंसंस्कार हे मुळात घरातच होतात. चांगले वाईट म्हणजे काय ? त्याग, समर्पण, प्रेम, सुख, दुःख, स्वैराचार, स्वातंत्र्य, मान, सन्मान, यश-अपयश यांच्या परिभाषा आणि हे जगणं कसं जगावं, सोसावं संयम ठेवून. एक मुलगी म्हणून मोठी होताना बाईनं आपलं शील, बाईपण कसं जपावं. हे सगळ आपण आई, आजीकडूनच शिकतो नाही का ?
‘खरंतर आई आनंदी तर घर आनंदी राहते,
घर आनंदी तर समाज आनंदी,
समाज आनंदी राहिला तर राज्य आनंदी
पर्यायाने सारा देश आनंदी होईल.’
डाॅ. कलाम यांनी किती छान लिहून ठेवलंय. साऱ्या विश्वाचं मूळ सुखाचं हे आईच्या डोळ्यांत आहे. स्त्रीच्या मनात आहे. पण आपणहेच विसरतो. पण तरीही स्त्री रडत नाही तर ती लढतेच आहे. असंच माझी काकूआजी तिने खूप कष्ट केलं, संसारासाठी झटली. पोटच्या गोळ्यांसाठी दुःख पोटात घालून, हसू ओठावर ठेवून, सोशिकपणे आयुष्य जगली आणि आयुष्य कसं जगावं हेकाकूआजीच्या जगण्यातूनच माझ्यावर नकळतच बिंबले. काकूआजी कष्ट करत करत हसत हसत देवाघरी गेली. जाताना जीवनाचंमर्म सांगून गेली.
पार्वती आजीच्या हातचं चविष्ठ रूचकर जेवण. सात्विक जेवन बनवावं असं आजी म्हणायची," जेवण बनवताना आपली वृत्ती नेहमीनिर्मळ ठेवावी, आनंदी ठेवावी कारण तोच आनंद तोच भाव जेवणात उतरत असतो." मामीचा, मायाळू, दयाळू, कनवाळू स्वभावमाणसं कशी जोडावी नाती कशी जपावी शिकवून गेला. अशा कितीतरी स्त्रीअभिव्यक्ती आपल्यावर आपले ठसे उमटवत असतात. आईचा सोशिकपणा, संसारातील भूमिका, नात्यांचे पाश कसे सांभाळावे हे शिकत असतानाच. शालेय जीवनात आपल्याला तिसरीचौथीच्या पुस्तकातच किंबहुना आजीच्या- आजोबांच्या मुखातून ऐकलेल्या जिजाऊच्या गोष्टी प्रेरणा देतात. बालशिवाजीघडवतानाची जिजाऊ आई आपले आदर्श बनते. स्त्री शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची भूमिकामनात खोल रुजते. इंदिरा संत, कवयित्रि बहिणाबाई चौधरी, संत मुक्ताबाईच्या ओव्या जीवनाचं गणित सहज उलगडून दाखवतानाशालेय जीवनातील कवितातून या स्त्रीअभिव्यक्ती आपल्या जीवनाच्या जडणघडणात नकळत सहभागी असतातच.
आपली बहीण, जी सतत आपल्या पाठीशी उभी असते. चुकलं तर कान पिळणारी आणि चांगलं झालं तर कौतुक करणारी. तीचावाटा तर लाखमोलाचा असतो आपल्या यशात. शाळेत, काॅलेजात अशा अनेक वर्गशिक्षिका होत्या. शाळेत शिंदेबाईंची शिस्त, दहावी बारावीत मोरेबाईंचा दरारा, महाविदयालयीन शिक्षणात पवार बाई, अॅलीना मॅमनी कविता आणि कादंबरी लेखन मनात असंखोल रूजवलं की वाटायचं ऐकतच राहावं ते कादंबरीचं विश्व. एम.पी.एस.सीचा अभ्यास करताना कुलकर्णी मॅडमचं वर्तन व अभ्यासयांचा कळत-नकळत झालेला परिणाम. ज्ञानप्रबोधिनीच्या गुरूकुल पध्दतीचे संस्कार, या स्त्री- अभिव्यक्ती एकिकडे आणि काॅलेजातअसताना माधुरी दिक्षितचा प्रभाव होता. पंतप्रधान इंदिरा गांधी या सतत डोळ्यांसमोर टि.व्हीवर असायच्या. तसेच टि.व्हीवर निवेदनकरणाऱ्या, बातम्या देणाऱ्या स्त्रिया होत्या. नकळत त्यांचे हावभाव व त्यांची शैली मनावर परिणाम करत होती. तर एकिकडे झाशीचीराणी, अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे, डाॅ. आनंदीबाई जोशी, यांचा जीवनप्रवास वाचताना नकळत यांचा जीवनावर प्रभावपडत होता. आत्ताचं उदा. घ्यायचं तर माजी महिला राष्ट्रपती. डाॅ.प्रतिभा पाटील मला आदर्शवत वाटतात एक उच्च पदस्थ अधिकारीम्हणून, तसेच माई- मा.सिंधूताई सपकाळ ताई, मा.डाॅ.स्मिता कोल्हे, मा. रश्मी करंदीकर मॅम, मा. पद्मश्री शितल महाजन... याबरोबरच माझ्या सर्व मैत्रणीं ज्या कुठल्या ना कुठल्या कलागुणात पारंगत आहेत... त्यांच्या कलागुणांच्या कळनकळत पाॅझिटिव्हवेव्हज आपल्यापर्यंत पोहचत असतात. व याचाही वाटा आपल्या व्यक्तीमत्व विकासावर होत असतो असे मला वाटते.
तनुजा ढेरे
No comments:
Post a Comment