" इंटरनॅशनल स्कूलस म्हणजे पैसे भरून विकत घेतलेलं दुखणं."
"ये आई ऐकना चलना आम्हाला टिचर ने नविन प्रोजेक्ट दिलाय." आई ," काय परत नविन प्रोजेक्ट अगं गेल्या आठवडयात तर आपण चार कलर चार्ट पेपर, कलर पेन , डेकोरेटिव्ह इ.सगळं हजार रूपयाचं सामान घेतलं ना." आज परत नविन स्क्रॅब बुक परत प्रिन्टस काढायच्या हे जास्ती होतंय. असं कर टिचरलाच देत जा म्हणावं ना प्रोजेक्ट बरोबर सगळं साहित्य. आणि प्रोजेक्ट झाल्यावर परत काय करता गं त्या सगळ्याचं ढुंकून ही पाहात नाही त्याकडे. " ये मम्मा असं काय गं करते तो प्रोजेक्ट हिस्ट्रीचा होता.हा जाॅग्रफीचा आहे .तुला यातलं नाही गं समजणार जाऊ दे. चल बरं आत्ताच्या आता सामान हवंय.'
" हे बघ मी येते पण जेवढं लागेल तेवढंच साहित्य घे. आणि साहित्य घेऊन झाल्यावर त्याबरोबर क्लिपस, पिना नविन कंपास बाॅक्स गेम काही मागायचं नाही.ना त्या दुकान दारासमोर दुकानात हट्ट करायचा. आणि पाच ते दहा मिनिटात पटकन सगळं साहित्य घ्यायचं लक्ष्यात आलं. नाहीतर अर्धा एक तास लागतो. प्रिन्ट ऑऊट सामान घ्यायला.मला बाकीचं ही खूप लिहायचं असतं आणि खूप काम ही आहे घरी." हो गं चल आता. मॅडम चं नेहमी ठरल्याप्रमाणे हजारच्या ऐवजी पाचशे रूपयात काम होतं. पण मागे कुरकुर असतेच." मम्मा हे घेना ते हवंय."पण आज ठरवलेलं असतं दुसरं काही नाही .मी ठाम निर्णयावर.अर्ध्या तासात घरी परत. मी मनातल्या मनात खुश अर्धा तास बडबड केली पाचशे रूपये वाचले.
सांगायचा उद्देश्य हाच की काय हे आजची शिक्षण पध्दती. एक वहया पुस्तकाचा संच घ्यायचा तर सहा ते सात हजार रूपये लागतात. इयत्ता सहावी काय अन पहिली काय. युनिफाॅर्म ही तसेच हजार रूपये एक सेट आणि चक्क या उच्च वर्गिय आई वडील चारचार पाचपाच सेट घेतात. शाळेतून सहल जाते ती कुठे दुबई ,ऑस्ट्रेलिया पन्नास हजार ते एक लाख खर्च काय म्हणायचं...काय बोलायची सोयच नाही.शाळेची फि वर्षाला एक एक लाख परत डोनेशन अॅडमिशन घेताना घेतलेले वेगळे.शाळेच्या वाहनासाठी पंधरा ते वीस हजार भरायचे वर्षाचे.सगळंच अॅडव्हान्स. बरं एवढं असुनही शाळेतले रिझल्ट समाधानकारक असावेत तसं ही नाही.मग काय उपयोग.पॅरेन्टस मिटींग मधे उपदेशाचे ढोस देतात. काय तर तुम्ही मुलांकडे लक्ष दया घरून करून घ्या..म्हणजे टयुशन आली.टयुशनचे दर तासावरून ठरतात .तिथे ही फुल्ल पैसे वसुल करण्याचा धंदा.मग शेवटी आपणच शिकवा मुलांना हाच योग्य पर्याय व मार्ग शेवटी आपल्या मुलाची प्रगती महत्वाची.
तर मग शिकवायला घेतलं तर काय सगळं डोक्यावरून जातं. जो या मुलांना पहिली दुसरीला अभ्यासक्रम आहे तो मला पाचवीला होता..धड नीट अक्षरओळख नाही अश्या मुलांना शाॅर्ट स्टोरीज आणि काय काय तो अभ्यास..' आय सी एस सी बोर्ड ..पेक्षा मला तर स्टेट बोर्डच आवडतं.पण आता याचं म्हणणं हे बघ उगाच त्रागा नको असच चालावं लागणार व असणार एकदम फास्ट त्याला पर्याय नाही..' कारण सगळं जग फास्ट चाललंय पुढं मुलांनी नको म्हणायला व आपल्याला नको वाटायला आपण नाही प्रयत्न केले बेस्ट देण्याचे...' आजकाल मुलांना एवढं अभ्यासाचं आणि होमवर्क चं टेन्शन नसतं तेवढं या आया डोक्यावर घेतात घर.मुलांना शाळा आणि अभ्यासातून श्वास घ्यायला जागा ही मिळत नाही. खेळायचं कधी या मुलांनी हा प्रश्न मला सारखा पडतो.
मला तर या १०० % मार्क मिळालेल्या मुलाचं कौतुक वाटतं. पण याबरोबरच ९५ % ९४ टक्के मिळालेल्या मुलांना हव्या त्या शाखेत आपल्या मनासारख्या ठिकाणी अॅडमिशन नाही मिळत याचं वाईट वाटतं. एवढं अभ्यास करून काय उपयोग.खरंतर अभ्यास मार्क्स या बरोबर मुलांचा सर्वांगीण व्यक्तीमत्व विकास महत्वाचा.आम्हाला तर आठवंतय असं कोणीच ओझं लादलं नाही .अभ्यासचं ना नव्हतं.तसं माझं लक्ष्य कधी नव्हतं अभ्यासात ही गोष्ट वेगळी. पण दोन शाळेचे ड्रेस , चप्पल कापडी पिशवी एक ते दोन डझन वहया सहा ते सात पुस्तकं..आणि वर्गशिक्षक जे काही शिकवतील ते एवढंच पण हसत खेळत शिकलो शाळा. खेळाचे, संगिताचे तास, वार्षिक संमेलनं ,सहली सगळं खूप एन्जाॅय केलं. पण आई वडीलांना कधी या गोष्टीचं टेन्शन घेताना नव्हतं पाहीलं. आजकाल आईवडीलांनाच गरज आहे मुलांना शिकवण्याची शाळा असंच एकंदर वातावरण ,मुलांना सारखं म्हणावं लागतं चला ऊठा शाळेत जा होमवर्क करा.आम्ही तर आमचं आम्हीच करायचो अभ्यास. तात्पर्य एवढंच सांगायचंय की हे ओझं विनाकारण शिक्षण पध्दतीचं वाढत चाललंय याला कारणीभूत ....आपण आहोत वाटायला लागलंय कारण आपण नाही नाही म्हणतो आणि एवढी फी भरतोच...हे या शाळांना ही बरोबर माहीती झालंय का ?... विचार तर नक्कीच करायला हवा...पैसे देऊन विकतंच दुखणं आहेत या महागडया शाळा.
सौ. तनुजा ढेरे




