Sunday, 30 August 2020

वळण

जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं त्याच्यातील असुरक्षितेची भावना म्हणण्यापेक्षा स्वतःविषयीची काळजी वाढत जातेशेवटी काळजी म्हणजेच असुरक्षितता नाही का ? स्वःता विषयीच्या जाणीवा प्रगल्भ व्हायला लागतातआणि या जाणिवा प्रगल्भहोत असताना आयुष्य आपल्या मुठीतून निसटतं आहे असं वाटू लागतंआपल्याला आठवण व्हायला लागते जगलेल्या  जगलेल्याअनुभवलेल्या क्षणांचीहिशोब करता करता मग अगदी बोटावर मोजण्या इतके क्षण जगलेलेअरेच्या हे राहिलंच की जगायचंअरेच्या ! हे करायचं राहुन गेलं हे उद्गार आपोआपच ओठावर येतात आणि मग चालू होतो प्रवास पुन्हा नव्याने मागे वळून पाहताना जगलेल्याअपुऱ्या राहिलेल्याईच्छा आकांक्षा पुर्ण करण्याचा अट्टाहासकाहीजण अगदी सहजतेने असू देत जाऊ दे म्हणत सोडूनदेतात विषयतर काही जीवना विषयी रसिक असलेले लोक तितक्याच उत्कटतेने पुन्हा जगण्याचा प्रयत्न करू पाहतातखरंतरआयुष्यात माणूस कधी यशस्वी होतो तर कधी कधी नैराश्याच्या गर्तत अडकतोकेलेले संकल्प पूर्ण करतो नाहीतर शेवट पर्यतकामाचा गाडा हाकत राहतोनाहीतर एकतर आयुष्य भर समाधान मानत राहतोनाहीतर कुरकुरत राहतो.


जो तो आपण अजुनही तरूणच आहोत या अविर्भावात जगण्याचा अट्टाहास करतोअरेच्या आपण ही गोष्ट पूर्वीच करायला हवीहोतीहे राहयलच की जगायचं असं बोलतानाआपण परत नव्याने सुरवात करू राहिलेले क्षण जगू असे म्हणत मनाशी खूणगाठबांधत राहतोसमाजसंसारनोकरीजबाबदारीकर्तव्य पार पाडता  पाडता स्वतःचं जगणं आपण विसरून जातोआपल्यालाकाय आवडतं काय नाही हा विचार मागेच राहतोमनाला मुरड घालुन जगत राहतोखरंतर आपण दिवसातील कितीतरी वेळ अगदीअसाच वाया घालवतोते आपल्या लक्ष्यात ही येत नाहीखरंतर ते क्षण आपलेच असतात पण आपण सहज कानाडोळा करतो यागोष्टीकडे आणि जाऊ दे आता कंटाळा आलाय ही निरूत्साही भूमिका त्यातून बळावते.


मग साक्षात्कार झाल्यासारखं आयुष्याचा एका टप्प्यावर आपले आयुष्य आपल्या मुठीतून निसटतं आहे असं वाटत असतानाआपल्याला आठवण व्हायला लागते जगलेल्या  जगलेल्या अनुभवलेल्या क्षणांचीहिशोब करता करता मग अगदी बोटावरमोजण्याइतके क्षण जगलेलेअरेच्या हे राहिलंच की जगायचंअरेच्या हे करायचं राहुन गेलं हे उद्गार आपोआपच ओठावर येतातआणि मग चालू होतो प्रवास पुन्हा नव्याने मागे वळून पाहताना  जगलेल्या अपुऱ्या राहिलेल्या ईच्छा आकांक्षा पुर्ण करण्याचाअट्टाहासकाहीजण अगदी सहजतेने असू देत जावू देत म्हणत सोडून देतात विषय तर काही लोक जीवना विषयी रसिक असलेले तितक्याच उत्कटतेने पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू  पाहता यशस्वीही होताततर काही जण मध्यंतरावर होनाही हो नाही करत समाधान मानून तिथेच व्यस्त राहतात आत्ममग्न.


"अरे नाही आता तर चाळीसी लागलीय एकोण्ण चाळीसावं पूर्ण झालंय अजून एक वर्ष आहे चाळीशी गाठायला. "स्वतःचंचसमाधान करून घेतो.

"
नाही रे तुला चाळीसावं लागलं तुझी जन्मतारीख काय मग नाही हो करत एकोणचाळीस पूर्ण चाळीशीव्हायचीय यावर हिशोब संपतोमग हळुच आपला चेहऱ्यावरूनकेसावरून हात फिरवतोतोपर्यंत आपण आरश्यासमोर येऊन उभेराहतोएखादा पांढरा केस काळ्या केसातून डोकावणारा अस्वस्थ करतोआपण या हेअरस्टाईल च्या नावाखाली आपण केसांनाकिती वर्ष झाले तेलच लावायचं विसरलोयआता रोज केसांना खोबरेल तेल लावायला हवंआपण इतक्या दिवस नीट चेहऱ्याचीकाळजी नाही घेतलीडोळ्याखाली थोडसं काळं झालंयचेहऱ्यावरील एखादीच सुरकुती पण खूपच अस्वस्थ करतेपोटाला पडलेलीवळकटी पाहुन अरे  नाही आता रोज चालायला हवंनववा महिना लागलाय वाटतं इतकं पोट डेरेदार वाढलंय असं सतत वाटतराहतं.एक ना दोन त्रुटी आपल्याला सगळं आठवायला लागतंआणि आपल्या मनात आपल्या दिसण्या बाबतची असुरक्षितता आणिजागरूकता एकाच वेळी निर्माण होते.किती ही चांगले महागडे कपडे चपला गाॅगल लावला तरी तुमचं वय अथवा तुमचं असणं आणिदिसणं लपवू शकत नाहीनाते थोडंफार पाच दहा टक्के इकडे तिकडे त्यानं फरक पडू शकतोपण मूळात तुमचं व्यक्तीमत्त्वमहत्वाचं.


आणि अचानकच आपण स्वतःबद्दल पझेसिव व्हायला सुरवात व्हायला लागतोअरे ! आपण किती बारीक होतो तेंव्हा नी आतापाहासगळी सुख पायाशी लोळण घालतायेत आणि आपण वरचेवर आळशी होत चाललोयएक वेळ अशी होती की आपण कितीबारीक होतोएकदम सडसडीत बांधालांबसडक काळे कुळकुळीत केस .पाणीदार डोळे आणि आता आपणच आपल्याकडेकामाच्या नादात पाहयचं विसरलो आणि अशी अवस्था करून घेतली खरंतर पण नाही आता महिन्यातून एकदा फेशियल करणारचरोज चालायला जाणारचवेळेवर जेवणार वेळेवर झोपणार आणि स्वतःची काळजी घेणार असं म्हणत लवकर उठायचं ठरवूनअलाराम लावून झोपून जातोदुसऱ्या दिवशी अलाराम वाजून ही आपण उठत नाहीतसेच लोळत राहतोअरेच्या अलाराम वाजलाहोय आपल्याला कळले ही नाहीअरेच्या आळस झटकत मग उदयापासून उठुया असं म्हणतोपण हा उदया कधी उगवतच नाहीउदया उदया म्हणता किती तरी दिवस असेच जातातएखादया दिवशी फेरफटका मारून आलं की मनाचं तोकडं समाधान करत परतमन आहे तसच जगू लागतंकारण सवय आणि अंगवळणी पडलेलं वळण मोडत नाही लवकरपण आजपासून सुरवात केली तरनक्कीच आपण उदयाचे दिवस आनंदात जगू शकतोसदाफुली सारखंसकारात्मक दृष्टीकोनासह.


सौतनुजा ढेरे

No comments: